Aahar Niyojan | आहार नियोजन | Aahar Niyojan Kase Karave Marathi Madhe |
Aahar kasa Nivadava (आहार कसा निवडावा) : सध्या झपाट्याने वाढत जाणाऱ्या जुनाट आजारांमुळे सतर्क होऊन सर्वांचे लक्ष आहारावर केंद्रित होत आहे. आजकाल आपण Aahar Nijyojan करत नाही. आपण काय अन्न खावं? त्याचे काय फायदे आहेत? याबद्दल वाचणं, चर्चा करणं याचं जणू हल्ली फॅड आलेलं आहे. जुनी माणसं जशी निसर्ग नियमानं Aahar Nijyojan करत होती. त्यांच्या शरीराला पोषक आणि गरजेचा आहार घेत होती तसं आता राहिलेलं नाही.
कोणाला भेटायचं असेल तर साखर युक्त उत्तेजक असणारे चहा, कॉफी पिणं, सणाला साखर युक्त मिठाई खाणं, वाढदिवसाला साखर मैदा युक्त केक कापणं आणि काही प्लॅन नसेल तर कुठल्यातरी नव्या ठिकाणी जाऊन नवं काहीतरी खाऊन पाहणं हे आजकाल नवे ट्रेंड बनले आहेत. मजा याची वाटते की सर्व काही साजरं करायला आपण समाज म्हणून आरोग्याला हानिकारक अन्न खाणं स्वीकारलं आहे.

आपल्या शरीराला कोणतं अन्न लागतं? काय खाल्ल्याने पोषण मिळतं? आणि काय खाल्ल्याने त्रास होतो ?
खरं तर अन्न आपल्या शरीराचे इंधन आहे, आणि त्यामुळे ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. असं असताना बाकी काही माहिती असू दे अथवा नसू दे परंतु एक जीव म्हणून आपल्या शरीराला कोणतं अन्न लागतं? काय खाल्ल्याने पोषण मिळतं? आणि काय खाल्ल्याने त्रास होतो ? याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाला सखोल ज्ञान आणि स्वानुभव हा असायलाच हवा, ही गोष्ट अत्यंत साहजिक आणि स्वाभाविक आहे. पण आता काही उलट होत आहे. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे? किती पैसा कमवायचा आहे ? स्टॉक मार्केट कोणत्या दिशेला चाललं आहे? इतकं कशाला कोणत्या गाडीचा नव मॉडेल चांगलं आहे, हे सर्व व्यवस्थित माहिती असतं. पण अन्नाच्याबाबत आपण अगदी कमी माहितगार आहोत, हे मात्र नक्की !!!
Aarogya | स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी |आरोग्य

कधी आपण खूप प्रोटीन खायला पाहिजे असं ऐकतो. म्हणून भरपूर चिकन आणि अंडी खातो. तर कधी हे ऐकतो की, संपूर्ण शुद्ध शाकाहारी राहणं चांगलं असतं. कधी दर दोन तासांनी खाणं खावं असं ऐकतो, तर कधी सोळा तास उपवास करावा म्हणजे intermittent fasting करावं हे ऐकतो. इतकंच नाही तर जितक्या कॅलरीज खर्च करतो तितक्याच कॅलरीज अन्नातून घेण्यामुळे आपलं वजन वाढत नाही, अशा पद्धतीनं डायट करणारे अनेक जण होते. पण सुदैवानं आता असं करणं बंद झालं आहे हे आणि असे अनेक भ्रम अन्नाविषयी निर्माण झाले आहेत. त्यात एक नवीन गोष्ट ऐकू येऊ लागली आहे ती म्हणजे विगन डायट. या संपूर्ण शाकाहारी अन्नात दुग्धजन्य पदार्थांचा वापर करू नये.
इतक्या सर्व प्रकारांमध्ये नेमकं कोणतं डायट निवडावं? निवडताना नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? आपली शरीरयष्टी, दिनचर्येत शारीरिक आणि मानसिक कष्टाचं प्रमाण इत्यादीनुसार योग्य Aahar kasa Nivadava ? आहार कसा असावा? ऋतुमानानुसार आहारात काय घ्यावे? काय घेऊ नये? आहार नियोजन कसे असावे? Aahar Niyojan याबद्दल आपण येत्या काही लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत.
Aahar Niyojan बाबत, अन्न ग्रहणाबाबतचे काही साधे नियम पाहूया –

- अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.
- अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.
- अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.
- भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.
- आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.
- दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.
- अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.
- खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.
- अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.
- जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे. यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.
- यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.
हिवाळ्यातील Aahar Niyojan , पचनक्रिया होईल सुरळीत…..
दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात खातो. असे उष्ण पदार्थ पचायला वेळ लागतो, त्यामुळे कधी कधी पोटांत बिघाड होतो. हिवाळ्यात अन्नाचे पचन चांगले होते या समजुतीखाली नानाविविध पदार्थांवर ताव मारला जातो आणि त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. उन्हाळ्यात आपण जास्त चालतो. मात्र हिवाळ्यात प्रचंड थंडी असल्याने फारसे घराबाहेर पडत नाहीत, यामुळे हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. पचन क्रिया व्यवस्थित नसेल तर कशाचीही चव चांगली लागत नाही
Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. या आरोग्यदायी सवयी कोणत्या ते पाहूयात.
हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो करा ५ सवयी…
१. कोमट पाणी प्या… हिवाळ्यात, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कोमट पाणी प्यावे. त्यामुळे मालत्याग होऊन पोट साफ होण्यास अधिक मदत मिळते. रिकाम्या पोटी आधी कोमट पाणी प्यायल्यास ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते. कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
२. हर्बल टी प्या… हिवाळ्यात, सकाळी उठल्यानंतर हर्बल टी जरुर प्यावा. जर तुम्ही दालचिनीचा चहा, ग्रीन टी किंवा इतर कोणताही हर्बल टी रिकाम्या पोटी प्यायला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे कोमट पाणी प्यायल्यानंतर सगळयात आधी हर्बल टी प्या. यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यासही मदत होते शिवाय हर्बल टी प्यायल्याने पचनक्रियाही सुरळीत चालते.
३. आहारात फायबर आणि प्रोटिन्स घ्या… हिवाळ्यात नाश्ता किंवा जेवणात फायबर आणि प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा अधिक जास्त समावेश करावा. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी डाएटमध्ये प्रोटिन्स आणि फायबर दोन्ही घेणे आवश्यक आहे. प्रोटीन घेतल्याने तुम्हाला दिवसभरात पुन्हा पुन्हा भूक लागणार नाही. याव्यतिरिक्त, फायबर सूज येणे आणि
४. हेव्ही नाश्ता करणे टाळा… हिवाळ्यात बहुतेकजण वारंवार भूक लागते म्हणून हेव्ही नाश्ता करतात. परंतु हे चुकीचे आहे. जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही हेव्ही नाश्ता करणे टाळावे. नाश्त्यात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण यामुळे तुम्हाला दिवसभर ॲसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या सतावू शकते.
५. वॉकिंग किंवा एक्सरसाइज करा… हिवाळ्यात बरेचदा वातावरणातील गारठ्यामुळे आपण बाहेर वॉकिंग किंवा एक्सरसाइज करण्यासाठी जाणे टाळतो. परंतु असे न करता दिवसांतून किमान ३० मिनिटे वॉकिंग किंवा एक्सरसाइज करावा. यामुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होतील. याशिवाय शरीरात ऊर्जाही टिकून राहते.
आपल्या पुर्वजांनी आहाराबाबत काही विशेष सांगितले होते…..
१. अजिर्णे भोजनम् विषम्
अगोदर केलेले भोजन जर पचलेले नसेल तर पुन्हा भोजन करून नये. कारण भोजन पचलेले नसताना त्यावर पुन्हा घेतलेले भोजन हे विषासमान असते. खूप भूक लागल्याशिवाय जेऊ नये.
२. अर्धरोगहारी निद्रा
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते. योग्य व योग्य वेळी निद्रा घेतल्याने म्हणजेच योग्य झोप घेतल्याने अर्धे रोग बरे होतात.
३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।
सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात. त्यामुळे आहार निवडताना योग्य काळजी घ्यावी.
४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।
लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात. लसूण मध्ये योग्य गुणधर्म असल्याने लसूण नियमित खाल्ल्याने शरीरातील हाडे जोडली जावू शकतात.
५.अति सर्वत्र वर्जयेत
कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे. कोणतीही गोष्ट अति केल्याने त्याचा परिणाम वाईट होतो. मग ते खाणे का असो. त्यामुळे भुकेपेक्षा ४ घास कमी खावे असे सांगितले जाते.
यावर क्लिक करा व या माहितीचा पुरेपूर वापर करा आणि आपले व्यक्तिमत्व सुंदर करा.

६. नास्थिमूलम अनौषधाम।
औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत. हीच भाजी खाल्ल्याने, किंवा फक्त याच भाजीत औषधी गुणधर्म आहेत व तीच खाल्ल्याने लाभ होतो असे नाही. सर्वच भाज्यांमध्ये वेगवेगळी औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे Aahar kasa Nivadava या लेखमालिकेत सांगण्यात येत आहे कि ऋतू प्रमाणे आहारात बदल करावे.
७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।
कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत. जन्माला येणारा जीव हा एक न एक दिवस जाणारच आहे. कोणताही डॉक्टर, वैद्य जीवाला अमरत्व देवू शकत नाही, त्यांच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे योग्य Aahar Nivadava निवडून आपले शरीर निरोगी ठेवावे.
८. चिंता व्याधि प्रकाश्य।
चिंता आरोग्याची वैरी असते. चिंता हि चीतेसारखी असते. अनेक रोगांचे आमंत्रण म्हणजे चिंता. त्यामुळे जास्त चिंता न करता आयुष्य आनंदी जगावे. झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे…. जीवन गाणे गातच रहावे.
९. व्यायामच्छ शनैही शनैही।
व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. High Intensity Workout आयुष्य कमी करते.
१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।
अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते. आपल्या पूर्वजांना सागितले आहे कि एक घास ३२ वेळा चावून खावे, म्हणजेच काय तर अन्न हे चावून चावून खावे. यामुळे अन्न पचनक्रिया सुरळीत होते.
११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।
आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते. अनुभव घ्या जर तुम्ही बाहेरून थकून भागून आला असला आणि आल्यावर आपण जर आंघोळ केली तर आलेला सर्व क्षीण निघून जातो व मन प्रसन्न होते.
१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।
भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. मित्रानो, जेवण करून आंघोळ करून नये यामुळे पचनाग्नी मंद होते होते व खाल्लेले अन्न पचन होण्यास बाधा येते.
१३. नास्थि मेघासमाम थोयम।
पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.
१४. अजीर्णे भेषजम वारी।
अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.
१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।
ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत. (नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी.)
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।
एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात. म्हणजेच काय तर Aahar Nivadatana आपल्या भोजनात पाच रस असावे. यामुळे पचन चांगले होवून शरीर निरोगी राहते.
१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि .
पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.